Wednesday 30 May 2012

वाचना साठी लतादिदिबद्दल

स्वरसाम्राज्ञी लतादीदी
सप्टेंबर महिना अापल्या देशाच्या दृष्टीने अभिमानाचा असतो. २८ सप्टेंबर! बरोबर ऐंशी वर्षांपूर्वी याच दिवशी या देशात जगातील एक सुरीले अाश्चर्य जन्माला अाले. अगदी एकमेवाद्वितीय भारतीय व महाराष्ट्रीयन असे हे जगातील अाश्चर्य म्हणजे लता मंगेशकर! नाव फक्त उच्चारायचाच अवकाश की गोड गाण्यांच्या तारकासमूहांची अाकाशगंगा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर …. माफ करा, मनात रुंजी घालायला लागते.
२८ सप्टेंबर, म्हणजे तुमच्या अामच्या सर्वांच्या हळव्या क्षणांच्या सोबती असलेल्या गाण्यांच्या जन्मदात्या, लतादिदींचा वाढदिवस! त्यांना त्या निमित्त लाख, लाख शुभेच्छा! दिदींच्या जीवनाबद्दल थोडी माहिती मी या लेखात देण्याचा प्रयत्न करीत आहे. यातल्या बऱ्याच गोष्टी सर्वश्रुत आहेत.
१) स्वरलतेची कुटुंबवेल: 
लतादिदींचा जन्म गुजराथी आई शुद्धमती व मराठी वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कुटुंबवेलीवर सीख मोहल्ला, इंदोर येथे झाला. भारतदेशाच्या इतिहासातील तो सुवर्णक्षण होता.
गोव्याच्या मंगेशीचे हे कुटुंब हर्डीकर नावाने अोळखले जाई. त्यांची स्वत:ची नाटक कंपनी होती. त्या कंपनीचे नाव पुणे, कोल्हापूर, सांगली, मिरज येथील नाट्यरसिकांच्या मनात घर करुन होती. मास्टर दीनानाथांनी गोव्याच्या मंगेशीच्या अाशीर्वादास्तव अापले आडनाव मंगेशकर असे बदलून घेतले. फिरत्या जीवनशैलीमुळे मंगेशकर कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षण मिळण्यात अडचणी येत. पण, गायनकलेचा वारसा व गाण्याचे शास्त्रपूर्ण शिक्षण घरच्या घरीच मिळाले.
२) बोलपटांचा उदय व कौंटुबिक आघात: 
१९३४ मधे पहिला बोलपट आलमआरा आला. बोलपटांमुळे दीनानाथ बलवंत मंडळ ही मास्टर दीनानाथांची कंपनी पूर्वीइतकी गर्दी खेचेना. हे कुटुंब त्यामुळे सांगलीला आले. नाटक कंपनी बंद पडल्यानंतर, १९४२ साली मास्टर दीनानाथांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
३) शाळा सुटली, पाटी फुटली:
आशाला सोबत नेले असता, शिक्षकांनी, "तिला न आणता शाळेत ये" असे सांगितले. त्यामुळे लतादिदी दुसऱ्या दिवसापासून शाळेत गेल्या नाहीत. फक्त एक दिवस शाळेत गेलेल्या लतादिदींना, सहा विश्वविद्यालयांनी डॉक्टरेट दिली आहे. त्यातील एक - न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आहे. खरेतर त्या स्वत:च एक विश्वविद्यालय आहेत व त्यांची गाणी हा डॉक्टरेटचा विषय आहेत. पुढेही शालेय शिक्षण घेणे लतादिदींना जमले नाही, कारण मास्टर दीनानाथांच्या मृत्यूच्यावेळी त्या बारा वर्षांच्या होत्या. कुटुंबाची जवाबदारी नियतीने त्यांच्यावर टाकली होती. वडीलांच्या मृत्यूच्या आठव्या दिवशी "पहिली मंगळागौर" या चित्रपटासाठी, गाण्यासाठी व अभिनयासाठी लतादिदींनी पहिले पाऊल या क्षेत्रात टाकले.
४) अभिनय क्षेत्रातील पाऊलखुणा:
१९४२ "पहिली मंगळागौर"  अभिनेता - शाहू मोडक
१९६० "कालाबाजार" (हिंदी)
१९८७ "राजकपूर" (इंग्रजी)
२००० "पुकार" (हिंदी) 
या चित्रपटात लतादिदींचे नाव अभिनेत्री म्हणून आढळते.
५) भविष्यवाणी:
"माझी लता कमाल करेल!" हे वडिलांचे शब्द लतादिदींनी सार्थ केले. या शतकातील दहा सर्वश्रेष्ठ कुंडल्यामध्ये लतादिदींची कुंडली आहे. इतर गायक फक्त दोनच अष्टके गाऊ शकतात, लतादिदी मात्र आठ अष्टके गाऊन जातात. त्यामुळे त्यांचे स्वरयंत्र जगातील एकमेव मानले जाते. लंडनच्या अल्बर्ट हॉलमधील लतादिदी यांच्या गायनाचा आलेख संपूर्णतया बरोबर व आदर्श आढळला. गाणे गाण्यापूर्वी त्या कागदावर सुरुवातीला श्री लिहून खाली स्वत:च्या हस्ताक्षरात ते गीत लिहून काढतात व शेवटी आपली स्वाक्षरी करतात. त्यात देवाचा आशीर्वाद व दिदींचा सुगंध जाणवतो. ज्ञानेश्वर माऊलींचे एक तेजोवलय, त्यांनी "मोगरा फुलला" साध्या सोप्या शब्दात गाऊन, रसिकांना नादब्रम्हाच्या तालावर डोलायला लावले. 

६) संगीतकार लतादिदी:
आनंदघन नावाने त्यांनी संगीत दिले आहे. हा घन काही काळ बरसला. जेवढा काळ बरसला त्यात त्यांनी रसिकांना चिंब भिजविले. हा मोगरा फुलला व त्याचा सुगंध विश्वाला मोहित करुन गेला. राम राम पाव्हणे, मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं, तांबडी माती या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. या आनंदघनाने सूराच्या नादमय सुरावटीत रसिकांना चिंब भिजवून टाकले. 

७) मी मराठी:
लतादिदींवर महाराष्ट्रीयन मराठमोळे संस्कार आहेत. त्यांच्या घरी हिंदू सण, उत्सव, गणपती आनंदाने साजरे होतात. 'मी मराठी'चा रास्त अभिमान वाटायला, दादासाहेब फाळके ज्यांनी चित्रसृष्टीची सुरुवात केली, त्यांच्यानंतर मराठी माणसे या व्यवसायात कमीच आहेत. मात्र लतादिदीचे नाव त्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
८) संगिताला वय, भाषा बंधन नसते:
अगदी नर्गिस, मधुबाला पासून आजच्या तरुण अभिनेत्री म्हणजे करीना इत्यादी पर्यंत त्यांनी प्लेबॅक दिला आहे. याबाबत त्यांना एका मुलाखतीत विचारले असता त्या म्हणाल्या होत्या की,  "माझ्याकडे याचे स्पष्टीकरण नाही. माझी गायनाची कारकीर्द इतकी प्रकाशित का झाली याचे उत्तर माझ्याजवळ नाही." लहान वयातील तरुणींनाही आज त्यांचा ८० व्या वर्षीचा आवाज शोभून दिसतो हा दैवी चमत्कारच म्हणायचा. आजपर्यंत त्यांनी पन्नास हजार गाणी म्हटली आहेत. बहुतांश भारतीय भाषांमध्ये त्यांची गाणी आहेत.
संगीताला वय नसते. देशाच्या मुकुटातील तो हिरा आहे. हिऱ्याच्या तेजाने डोळे दिपतात, कानसेन तृप्त होतात. हा हिरा चिरतरुण आहे, आवाज चिरंजीव आहे. प्रतिलता, बाललता वगैरे नावाने किती आले आणि गेले पण लता ती लताच!
९) दाता सुन, मौला सुन:
'जेल' या मधुर भंडारकरांच्या चित्रपटातील हे भजन २१/०७/०९ ला गायले. गुढघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी हे रेकॉर्डींग पूर्ण केले व "हनुमान चालीसा" ही त्यांची रेकॉर्डही पूर्ण केली. "ऐ मालीक तेरे बंदे हम.." या प्रार्थनेपासून सुरु झालेला हा सुरीला प्रवास असाच चालु राहो!
१०) आहार, आजार:
अगदी झणझणीत तिखट त्यांना आवडते. लवंगी मिरची खाणाऱ्या दिदी मधाप्रमाणे गोड हसतात. तळलेले मासे, कोल्हापूरी तांबडा रस्सा मटन त्यांना आवडते. 
बालपणी तिसऱ्या वर्षी त्यांना देवी आल्या होत्या. त्यांना सायनसचा त्रास आहे. नुकतीच त्यांची गुढघ्याची शस्त्रक्रिया झाल्याचे वर आलेच आहे.
११) सैनिकहो तुमच्यासाठी:
१९६२ च्या भारत चीन युद्धानंतर लतादिदींनी गायलेले "ऐ मेरे वतन के लोगो .." उत्कृष्ट देशभक्तीपर गीत आहे. या गाण्यातील आर्तता मनाला भिडल्याने पंडीतजीच्या डोळ्यात अश्रु तरळले होते.
१२) आयेगा आनेवाला:
गूढ, आशादायी, करुण किनार असलेले, गतजन्मीचे नाते सांगणारे हे गाणे त्यांचे स्वत:चेही आवडते गाणे आहे, तसेच लोकप्रियही!
हातातील छोट्या हातरुमालाशी चाळा करीत, गोड आवाजात बोलणारी, पांढऱ्या साडीतील लतादिदींची मूर्ति गानसरस्वतीच वाटते. त्यांच्या पांढऱ्या साडीला, त्या, त्या दिवसाच्या ग्रह, रंगाप्रमाणे किनार असते. त्यांच्या पायात सोन्याची साखळी असते व त्यांना हिऱ्याचे दागिने आवडतात.
१३) स्वभाव:
त्यांचा स्वभाव मनमिळावू आहे. त्या लाजऱ्या, बुजऱ्या अंतर्मुख व्यक्ति वाटल्या तरीही मैत्रीनंतर कळते की त्या मिस्किल, विनोदी स्वभावाच्या अाहेत व अनेक विनोदी किस्से व चुटकुले सांगतात. त्यांना फोटोग्राफी व स्वयंपाकाचा छंद आहे. "देवाने दिले त्यात मी तृप्त आहे" अशा शब्दात त्या आपल्या जीवनगाथेचे वर्णन करतात. भारतरत्न सारखा उच्च किताब मिळूनही त्या विनम्र आहेत. आपल्यापेक्षाही अधिक उत्कृष्ट कलाकार जगात आहेत असे म्हणून त्या नवोदित कलाकारांचे कौतुक करतात. आपण आई, वडीलांच्या आशीर्वादामुळेच भारतरत्न मिळवू शकलो असे त्या सांगतात. १९४२ सालापासून २०१० पर्यंत ६८ वर्ष गात असूनही त्या वडीलांच्या अपमृत्यूची खंत काढतात. विनम्रपणामूळे कलाकाराची उंची हिमालयाएवढी वाढते हे लतादिदीवरुन कळते.
१४) समाजसेवा, ऋण फिटता फिटेना:
१९४९ साली दादरा, नगर हवेलीच्या मुक्तीसाठी लतादिदींनी पुण्यात चॅरिटी शो केला होता. १९८५ साली टोरंटोत त्यांच्या चॅरीटी शो वैशिष्ट्य म्हणजे, तिसऱ्या जगातील कलाकाराने पहिल्या जगातील कलाकारासाठी सेवाभावी कार्यक्रम करण्याची ती पहिलीच वेळ होती. २००१ मध्ये गुजरात भुकंपग्रस्तासाठी त्यांनी कार्यक्रम केला होता. त्याच वर्षी पुण्यात सर्वसोयींनी सुसज्ज असे मंगेशकर हॉस्पिटल त्यांनी सुरु केले. वृद्धाश्रम काढायचा त्यांचा मानस आहे.
१५) घर:
लतादिदी प्रभूकुंज या पेडर रोड वरील इमारतीत आपली भावंड - बहिण मीना, आशा,  उषा व भाऊ हृदयनाथ सह राहातात. प्रभूकुंजवर वर्दळ नसते पण दिदींची भेट झाली नाही. काही स्वप्ने आयुष्यात पूर्ण होणे अवघडच असते.
१६) फिरुनी नवी जन्मेन मी:
लतादिदींना पुढील जन्मी पुन्हा भारतीय व महाराष्ट्रीयन म्हणून जन्माला यायचे आहे, मात्र पुन्हा स्त्रीजन्म नको असावा. मलापण तसेच वाटते
१७) एकमेव अद्वितिय:
भारतरत्न व दादासाहेब फाळके पुरस्कार दोन्ही मिळालेल्या त्या एकमेव महिला आहेत. लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. गिनीज बूक मध्ये जास्तीजास्त गाणी गाण्यासाठी त्यांचे नाव नोंदले आहे.
१८) ऐ मालीक तेरे बंदे हम:
परमेश्वरा तू आम्हाला लातादिदींसारखी गायिका दिलीस, त्यांच्या अनमोल सुरांचे दान दिलेस. किती धन?
'पायोजी मैने राम रतन धन पायो'
'कैसे दिन बीते कैसी बिती रतियॉ'
'दिलका दिया जलाके गया'
'दुनिया करे सवाल'
'अल्ला तेरो नाम'
'तेरे लिये हम हे जिये'
….. ही दिदींची आवडती गाणी
१९) मी कशी शब्दात सांगू:
गानकोकीळा, स्वरसाम्राज्ञी कुठल्याही शब्दांने वर्णन करा, शब्द तोकडेच पडतात. दिदींवर आजपर्यंत अनेक पुस्तके लिहिली गेली. हरीश भिमाणींचे "इन सर्च अॉफ लता मंगेशकर", राजू भारतनचे "लता मंगेशकर बायोग्राफी" ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. नदी म्हणजे पाणी नव्हे तर खुप काही अर्थ त्या शब्दात सामावला असतो तसे सूर व ताला पलिकडे दैवी काही लतादिदींच्या गाण्यात आहे.
२०) काळ बदलला? कधी?:
रिमिक्सचा जमाना आला. एक्सप्रेस वे वरून व विमानामधून जलदगतीचा प्रवास सुरु झाले, मात्र बाळ जन्माला आले की अजूनही बघा को ऽ हम ऽ ऽ असेच रडते. सूर्य पूर्वेलाच उगवतो. दिवसाची सुरुवात पुजेनेच होते व आवडती गायिका लता मंगेशकरच असते. 


२१)भैरवीची गोष्ट कशाला? आकाश नीळे असे पर्यंत लतादिदी गात राहतिल.
"दिदी, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे!"
दिदींना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!
शुभांगी पासेबंद
(scpaseband@gmail.com)           

Monday 28 May 2012

writing for hobby and waiting to be published sunya sunya mehfalit majhya

attachment.jpg



*Sunya sunya mehfalit majhya*
kadambari2009
a publisher has been aproached now , may be published and or may be as e book
the cover page is based on a picture designed by my late sister in law, pradnya,
the publisher wants me to change the cover page, not yet decided and not yet heard from him.

rahu de gharte 2008 has a reference of birds and its coverpage has woodpecker family on coverpage.
I could not scan it to upload on blog
English novels *why did I fall in love?*  and *unholy water* are available on Amazon.com.createspace as it was an entry for the international on line novel writing

planing to join creative writing from 6 th jun in mumbai university to improve my writing skills.

I have to face critisism as generally feel good articles receive an aplaud, I write about some social problem or injustice or on the sting I feel.

Only Amir Khan can speak and mention about social problemss fearlessly, others have their constrains. Hats off to Amir Khan.
shubhangi

cover pages of mayur masa published in jan 2012

mayurmasa cover page
also read parikshan of the novel in loksatta , Lokrang dated 17/6/2012


it is my first book and I shall surely corect the discrepancy and exel in future

Thanks and regards to loksatta

I am planning to publish Second edition in a function about Lokshahir Annabhau Sathe
at Mumbai University Kalina Campus, Convocation hall on 1/8/2012 at the hands of Dr Prakash Khandge.
There is a function about Shahiranchi Shahiri, presided by Dr Rajan Velukar, Kulguru Mumbai university,
place Marshal hall,Jawaharlal nehru granthalaya, Kalina Mumbai University Campus
time 10.00
You all are invited to atend it



A baby is dear to mother despite a grand naming ceremony(Barse), likewise I like my book, though I could not publish first edition in a function as I have always dreamt
 Publication of second Edition photoes here

पासेबंद

  =shubhangi
Mayurmasa published on 1/8/12 at marshall hall
jawaharlal nehru hall
kalina
mumbai univrsity campus
Santacruz East
Paseband,Deshmukh
Photo and news article in Prahaar dated 2/8/2012
file://localhost/users/paseband/Pictures/iPhoto%20Library/Originals/2012/01-Aug-2012/DSC00715.JPG. 

Monday 21 May 2012

Only coverpage of mayurmasa,novel published in jan2012

A2744 (140) copy.jpg
आईचे आशीर्वाद

"घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिला पाशी"
अशी म्हण मराठीत आहे, तशीच एक संकल्पना मला परदेशी साहित्यात वाचण्यात आली. 'हेलिकॉप्टर मदर्स' म्हणजे "घिरट्या घालणाऱ्या आया." या आया, मुले शाळेत गेली, दूर गेली किंवा त्या स्वत: कामावर गेल्या तरीही मुलांच्या आसपास घिरट्या घालत असतात. म्हणजे फोन, इंटरनेट या माध्यमांद्वारे संपर्क साधून असतात.

मुले झिडकारतात, दूर्लक्ष करतात, हिडीसफिडीस करतात. "आई कटकट आहे म्हणतात", पण आई दूर्लक्ष करते. मुलाच्या आसपास वावरणारे कुणाच्याही नजरेच्या आवाक्याबाहेरचे दुष्ट शक्तिंचे विळखे तिच्या तिसऱ्या डोळ्याला बरोबर जाणवतात. तिच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी अधू झाली तरी तिच्या  तिसऱ्या डोळ्याला सर्व लख्ख दिसत असते. कुठली संगत मुलाला चांगली नाही, कुठला रस्ता मुलीला यायला चांगला नाही हे त्या आईच्या तिसऱ्या डोळ्याला त्या व्यक्तिच्या संपर्कात न येताही व त्या रस्त्यावरुन 'न' चालताही बरोबर कळते. तिची टेलीपथी अशी असते.
कंटाळा नाही, वीट नाही
आळस नाही, त्रास नाही
मातेवेगळी, मातेसम कुणी नाही
इतुकी माया कोठेची नाही
(दासबोध)
मुलांना आई दमली असली तरी सोबत यायला आईच हवी. तो बाबा घरात दमल्याची कहाणी ऐकवत पेपर वाचत टीव्ही बघत बसतो. पण दमल्यावर कोलमडून पडे पर्यंत आई कष्ट करत राहाते. पण मुलगा चुकला की "आईचे लाड" हा आरोप येतो. 

आई बद्दल खूप लिहीले गेले आहे. 

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
म्हणून श्रीकारानंतर शिकणे अ, आ, ई …
असेही लिहिण्यात आले आहे.

मातृत्वाची तयारी, गर्भसंस्कार अशाप्रकारे अनेक आर्थिक मोबदला देवून शिकवले जाणारे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र या विषयावर स्वानुभव हाच गुरू असतो. घर भर पसारा, आईला बाळंतपणामूले आलेला अशक्तपणा, आधार नसल्याची भावना, ही मातृत्वाची जबाबदारी यामुळे तिला गोंधळून जायला होते. मुल मोठे झाल्यावर, हे करू, ते करू असा विचार ती स्वत:शीच करत असते. तिला कुणाची मदत मिळाली तरीही आई जे कष्ट करते त्याची जागा तर कुणीच घेऊ शकत नाही.

वळवाच्या पावसाला व आईच्या कष्टाला मोजमाप नसते. कशाही परिस्थितीत असो, कष्टाला आईच हवी! मुलांची नर्स, मैत्रिण, सवंगडी, न्यायाधीश, वकिल, मध्यस्त, स्वयंपाकीण, मोलकरीण सर्व आईच असते. मुलांचे मन मोडू नये म्हणून गळ्यातील चेन मोडून ती त्याला सहलीला पाठवते. जगात लढायला तयार करण्यासाठी - त्याला कराटे क्लासला घाल, पोहायला शिकव. स्वत: काळजी करत बसते. आईही फक्त आईच असते. घरातील इतर गोष्टीतून तिचे लक्ष फक्त मुलातच असते. नवरा अोरडतो, "तुझे हल्ली माझ्याकडे लक्षच नाही", पण ती आईच्या भूमिकेतून बाहेर येऊच शकत नाही. आईपणाचा तो गणवेष घालून ती अहोरात्र आईच्याच भूमिकेत वावरते. ती मुलाच्या द्वारा जगते. मुलांच्या जीवनात तिचे अभेद्य व अटळ स्थान काही काळच असते पण आईच्या जीवनातील मुलाचे स्थान अाजन्म असते. आईचे लाड हे जन्मभर साथ देतात. कोवळ्या वयापर्यंत मुलाला आई बद्दल खुप प्रेम असते. आईचे हातात पकडलेले बोट त्याला सर्वाधिक जवळचा सुखशांतीचा शॉर्टकट वाटतो.
तेंव्हा शिकलेले कसे छान समजत असे
सगळे रंग तेंव्हा कसे छान वेगळे निघत
इतिहासातील सगळ्या राजांना मिशा असत 
तेंव्हाना धनुष्यबाण घेऊन मी लढाईला जात असे (जिंकत असे)
तेंव्हा ना मुठीमध्ये आईचे बोट बंद असे

आईचा मुलावरचा मालकी हक्क तिला जगापासून वेगळे पाडतो, पण तिला पर्वा नसते. मुल व आई यांचे स्वतंत्र राज्य या कालात असते. वडील या काळात पेईंग गेस्ट असतात किंवा बाबांची कहाणी ऐकवत बसतात.

आताशा या वाढत्या वयाबरोबर
मी खुपशी आईसारखी दिसायला लागलेय
जीव हरवून बसलेली असहाय नजर
अोढग्रस्तीला लागलेले अवघे शरीर - सारे तिच्या सारखेच!
आणि सवयही लागलीय तीच तशीच
'अो' न येणाऱ्या हाका मारत बसायची
आई तुझ्या अनावर आर्त हाकेला
उत्तर द्यायचे आम्ही टाळत होतो
तेंव्हा असच थारोळ साठायच का ग?
खरं सांगू का ते सारं आता आठवून
पाझरणारे हे डोळे पुसायला
हवाय आई तुझाच पदर! देशील आई, देशील?
तुला जगवण्यासाठी मी काहीही करु शकत नाही
हे लक्षात आल्यावर मनात विचार आला
तुझी तू जगत होतीस तेंव्हा तरी
तू जगावस, अस तुझ्यासाठी माझ काही चालल होते का?
मी तुझ्यासाठी काय केले?

आईसाठी करण्यासारखे खुप काही असते पण तिला गृहित धरुन आपण काहीच करत नाही, आणि तिच्या श्राद्धाला मात्र डोळे टिपून ताटभर जेवण वाढून कावळा शिवायची वाट बघत बसतो! तरीही आई मुलाला आशीर्वाद देते. आईचे प्रेम असे असते. आईचे लाड असे असतात.

शुभांगी पासेबंद
(scpaseband@gmail.com)
09869004712    

kasturi pakshi

Now I am working on a new novel about a rare bird Kasturi
In 1980 a film was released on the topic,
Kasturi bird a ternate ,which is said to be a bad omen by superstition,
 some how I feel very low and get haunted by the superstition that is it due to it?
I want that movie to be viewed can u mail it 
I shall publish the book as e-book,
presently posting coverpage
shubhangi

Thursday 17 May 2012

deva bola ho majhyashi


                   देवा बोला हो माझ्याशी
 देवा, कोणया अेका कविने म्हटले अाहे की 
देव देवळात नाही, देव  नाही देव्हारी
देव चोरुन ने अशी असे कोणाची पुण्याई
माञ कलियुग अाले अाहे अाणि कोणा पाप्याची नजर देवळातील देवावर पडली अािण त्याने देव चोरुन नेले
देबळातील दागिने,चान्दीची भान्डी, चोरीला जाण्याचे तुरळक प्रकार घङत असत माञ अाता कोकणातील
दिवे अागारातील सुवर्ण गणेश मन्दीरातून दीड किलो बजनाची शुध्द सोन्याची मूर्ति चोरटयानी चोरुन नेली अाहे: मूर्ति सोन्याची की दगडाची हा प्रश्न भक्तापुढे कधीच नसतो ,अभक्ताकडे असतो ;दिवे अागारातील या गणेशमूर्तिचे बाजारमूल्य चोराना बरोबर माहीत होते

 ही गोश्ट तशी १५ वर्शापूर्वीची अाहे दिवे अागार हे तसे कोकणातील छोटेसे गाव,समुद्र किनारी वसलेले,शान्त,लोक खाअुन पिऊन सुखी होते,गावात मन्दिरे होती पण सोन्याची नव्हती ,एक दिवस गावातील दर्ौपदी बाई यान्ना माडाच्या वनात खणताना एक २ बाय २ फूट अाकाराची मोठी ताम्ब्याची पेटी सापडली, या पेटीत गणपतीची  सोन्याची सुबक मूर्ति होती,हीर्याचे दागिने होते, हो ऽऽ लवकरच सर्व  ठिकाणी बातमी पसरली, दिवे अागार  स्थळ पर्यटन स्थळ बनले 'खानावऴी, दुकाने हाँटेल या सर्वानी गाव गजबजले,गणपती बाप्पाची कृपा झाली।

अाज १५ वर्शानन्तर ही  मूर्ति चोरीला गेली ,चोर अजूनही सापडत नाही मूर्ति परत मिऴत नाही देवाची मूर्ति असुरक्शित ?सावधान, राञ वैर्याची अाहे,देव चोरीला गेला अाहे,

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव अाहे असे म्हणतात ना,मग देवा तुमचीच चोरी झाली ? तर अाम्ही अाता कोणाकङे बघायचे? देवा बोला हो माझ्याशी,
देवा बोला हो माझ्याशी,देवाऽऽऽऽऽ


शुभान्गी पासेबन्द

Sunday 13 May 2012

attachment.jpg



kadambari
a publisher has been aproached now ,may be published as e book
the cover page is based on a picture designed by my late sister in law pradnya,
the publisher wants me to change the cover page, not yet decided and not yet heard from him.

planing to join creative writing from 6 th jun in mumbai university to improve my skill
माझे स्तंभ

अयोध्येचा राजा
चैत्र शुक्ल नवमी ही रामनवमी या नावानेच अोळखली जाते. या दिवशी दशरथपुत्र रघुकुल उत्पन्न प्रभु श्रीराम यांचा जन्म झाला. प्रभु श्रीराम यांची जन्मकुंडलीही अतिउत्कृष्ट अशीच होती. सर्वगुण संपन्न, एकपत्नीव्रत पाळणारे, जनता जनार्दनाचे त्राते असे प्रभु रामचंद्रांचे वर्णन केले जाते.
रामनामाच्या जपाने सर्व संकटे दूर पळतात. बुध कौशिक ऋषिंनी लिहिलेले श्रीराम रक्षा स्तोत्र सर्व संकटातून तारुन नेते.
घटका जाती, पळे जाती, काळ जातो ठणाणा।
आयुष्याचा ऱ्हास होतो, राम सारे म्हणाना।।
 - अशी राम नामाची महती आहे.
सीतामाते सारखी पत्नी, लक्ष्मणा सारखा बंधु व वीर हनुमानासारखा शिष्य असलेल्या प्रभुरामाच्या चरणी लीन होण्यातील आनंद अमृत तुल्य आहे. 
गीत रामायणातील "राम जन्मला ग सखी राम जन्मला" हा पाळणा लोकप्रिय आहे. जनमानसात प्रभु श्रीरामाबद्दल अोव्यांमध्ये, लोकगीतांमध्ये खुप ठिकाणी उल्लेख आहे. रामाचा पाळणा तर अजूनही म्हटला जातो. सीता स्वयंवराबद्दलचे आकर्षण जनमानसात खोलवर रुजलेले आहे. अजूनही कांही ठिकाणी लग्नपत्रिकेवर प्रभु श्रीराम व समोर वरमाला धरुन उभी असलेली सीता हेच चित्र छापलेले असते. विवाहाच्या चर्चेत प्रभु श्रीरामाचा उल्लेख असतो.
गौर वधु बरी, सावळ्या वराला
जानकी गोरी श्रीराम तो सावळा
किंवा
लाजली सीता स्वयंवराला
पाहुनी रघुनंदन सावळा
असा प्रभु श्रीरामाच्या सावळ्या रंगाचा उल्लेख आपण येतो.
श्रीरामाचे चरण धरावे, दर्शन मात्रे पावन व्हावे
सती अहिल्या दगडामाजी शापित होवून युगयुग माजी
प्रभु रामाच्या पदस्पर्शाने पाषाणासही जीवन आले. 
श्रीराम, श्रीराम या जपाने विलक्षण मानसिक समाधान मिळते.
उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उजळली
उभी कलश दुधाचा कौशल्या माऊली
ही भुपाळी सकाळ प्रसन्न करते.
विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी
राजा आला अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा
रामनाम किती आनंद देते बघा-
सहस्त्रनाम तत् तुल्य रामनाम वरानने
तरीही शेवटी लिहिते -
मंदिरातल्या मूर्तीतून का कधी राहतो राम? तुझ्या रे अंतरी त्याचे धाम।

---------------एक हजारोंमें मेरी बेहेना है।
शुभांगी पासेबंद
९८६९००४७१२
बहिणभावाच्या सुंदरनात्याचे वर्णन करणारी जी निवडक गाणी आहेत त्यात हे गाणे अव्वल नंबरवरला आहे. हरे राम! कृष्ण - द्रौपदीच्या त्या बहिणभावाच्या निर्मळ नात्याचे वर्णन या गाण्यात आहे. भाऊबीज हा तसा गरीब - श्रीमंत, श्रद्धाळू, अश्रद्ध सर्वच व्यक्तिंच्या जीवनातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भावाने बहिणीची भेट घ्यावी. तिच्या घरी जेवण करावे. तिच्या कडून अोवाळून घ्यावे व खास भाऊबीजेची भेट द्यावी, असा रूढ संकेत आहे. या दिवशी पत्नीच्या हातचे जेवण घेतल्यास चांगले नसते असाही समज आहे. बहिण भावाच्या नात्याचा सन्मान करण्याचा हेतू भाऊबीजेच्या सणात असतो. दिवाळीच्या चार दिवसात भाऊबीज अहम् असते. हे दोघेजण एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेले, एकाच घरात वाढलेले, बालपणी एकमेकाचे उष्टे खाऊन, भांडून गोड होणारे असे! मैत्रीचे, आंबट, गोड, कडू असे ते नाते असते! भाऊबीजेला बहिणीला भाऊ भेटीस आला नाही तर ती नाराज होते व चंद्राला अोवाळते. शब्दांच्या पलीकडे असे खास बहिणभावाचे नाते वरिल गाण्यात दिले आहे ---
-- देवा बोला हो माझ्याशी
 देवा, कोणया अेका कविने म्हटले अाहे की 
देव देवळात नाही, देव  नाही देव्हारी
देव चोरुन ने अशी असे कोणाची पुण्याई
माञ कलियुग अाले अाहे अाणि कोणा पाप्याची नजर देवळातील देवावर पडली अािण त्याने देव चोरुन नेले
देबळातील दागिने,चान्दीची भान्डी, चोरीला जाण्याचे तुरळक प्रकार घङत असत माञ अाता कोकणातील
दिवे अागारातील सुवर्ण गणेश मन्दीरातून दीड किलो बजनाची शुध्द सोन्याची मूर्ति चोरटयानी चोरुन नेली अाहे: मूर्ति सोन्याची की दगडाची हा प्रश्न भक्तापुढे कधीच नसतो ,अभक्ताकडे असतो ;दिवे अागारातील या गणेशमूर्तिचे बाजारमूल्य चोराना बरोबर माहीत होते

 ही गोश्ट तशी १५ वर्शापूर्वीची अाहे दिवे अागार हे तसे कोकणातील छोटेसे गाव,समुद्र किनारी वसलेले,शान्त,लोक खाअुन पिऊन सुखी होते,गावात मन्दिरे होती पण सोन्याची नव्हती ,एक दिवस गावातील दर्ौपदी बाई यान्ना माडाच्या वनात खणताना एक २ बाय २ फूट अाकाराची मोठी ताम्ब्याची पेटी सापडली, या पेटीत गणपतीची  सोन्याची सुबक मूर्ति होती,हीर्याचे दागिने होते, हो ऽऽ लवकरच सर्व  ठिकाणी बातमी पसरली, दिवे अागार  स्थळ पर्यटन स्थळ बनले 'खानावऴी, दुकाने हाँटेल या सर्वानी गाव गजबजले,गणपती बाप्पाची कृपा झाली।

अाज १५ वर्शानन्तर ही  मूर्ति चोरीला गेली ,चोर अजूनही सापडत नाही मूर्ति परत मिऴत नाही देवाची मूर्ति असुरक्शित ?सावधान, राञ वैर्याची अाहे,देव चोरीला गेला अाहे,

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव अाहे असे म्हणतात ना,मग देवा तुमचीच चोरी झाली ? तर अाम्ही अाता कोणाकङे बघायचे? देवा बोला हो माझ्याशी,
देवा बोला हो माझ्याशी,देवाऽऽऽऽऽ


शुभान्गी पासेबन्द   

Friday 11 May 2012

माझे पुस्तक मयूरमासा

माझे पुस्तक * मयूरमासा *महाराश्ट्र साहित्या संस्क्रुति मंडलातर्फे प्रसिद्ध झाले
मायबोलि प्रकाशनातर्फे 
वाचुन बघा 
अावडेल

29/5/2012

Anthropologists sugest a weak link between birds fishes and reptiles in the evolution chain, say fish and bird , that is peacock and a fish combined.
Similarly There is a thin line demarking dreams from reality. Mayurmasa are thoise ambitions, dreams and  halucinations in the life of an artist
prakashkacha phone -०२२२४९४५६१५